अरे अरे पावसा……. !

अरे अरे पावसा तू असा रे कसा 
कधी यायचं आहे हे विसरलास जसा 
दिवस वार वेळ काही ठरवलंस नाही 
येण्याची फारच केलीस घाई 
शाळेतच गेला नाहीस 
की सुट्टीचा महिना विसरलास बाई
आंबे फणस पिकायच्या आधी 
धावत आलास मधल्या मधी
तयार पिकांचा केलास नाश
पाण्या चिखलाची केलीस रास
अरे तुझ्या येण्याची 
तयारी करायची होती जोरात 
पण तू गडबड करून 
भिजून टाकलीस लग्न नी वरात
भरली धरणे नदी नाले 
समुद्राला आले उधाण 
शीतल रिमझिम सुख नाही 
सारं कसं झालं भयाण 
सैरभैर झाल्यासारखा वागू नकोस वेड्यासारखा 
साऱ्यांना तू हवा असतोस जन्मदात्या बापासारखा.
सौ मिनल सावंत.
मुलुंड मुंबई 


Leave a Reply